दापोली आणि उमरोळी ग्रामपंचायतींच्या या दुहेरी यशामुळे पालघर जिल्ह्याचे नाव राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल, पालघर जिल्ह्यास अभिमानाची पावती.





दापोली आणि उमरोळी ग्रामपंचायतींच्या या दुहेरी यशामुळे पालघर जिल्ह्याचे नाव राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल, पालघर जिल्ह्यास अभिमानाची पावती.
पालघर | (प्रतिनिधी)संविधान दिनाच्या औचित्याने दिल्ली येथे पालघर जिल्ह्यातील दापोली ग्रामपंचायत सरपंच हेमंत दिनकर संखे व उमरोळी ग्रामपंचायत सरपंच प्रभाकर पांडुरंग पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्कार तसेच नॅशनल लेव्हलचा प्रतिष्ठित ग्रामविकास सन्मान जाहीर करून गौरविण्यात आले. ग्रामपंचायतींच्या विकासकामांतील पारदर्शकता, लोकसहभाग, डिजिटल प्रशासन, स्वच्छता उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करत हा मानाचा सन्मान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ह्यांच्या हस्ते देण्यात आला.
✔ उत्कृष्ट कारभाराची राष्ट्रीय दखल
राज्य व केंद्राच्या संयुक्त समितीने संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करताना दापोली व उमरोळी या दोन ग्रामपंचायतींनी अनेक ग्रामीण भागांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे नमूद केले. जलव्यवस्थापन, महिलांच्या स्वयं-साहाय्य गटांची बळकटी, ग्रामसभांची सक्रीय अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन तसेच ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासन सुलभ बनवण्याची या ग्रामपंचायतींची कामगिरी विशेष ठरली. तेथे डेन्मार्कचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यांनी पालघर जिल्ह्यातील सरपंचांना कार्यक्रमात सर्वांना समोर बोलाऊन त्यांना भविष्यात येणाऱ्या काळात डिजिटलाईज होणार आहे.त्यांसाठी हि काळाचे गरज होणार आहे.त्यांनी दापोलीचे सरपंच ह्यांना देखील बोलण्यासाठी तेथे मंचावर सर्वांना समोर विचार मांडण्यास संधी दिली.तसेच डिजिटल संदर्भात माहिती दिली.
✔ संविधान दिनाचा विशेष सोहळा दिल्ली येथे पार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानप्रणेतृत्व व सामाजिक न्यायाची प्रेरणा जपत संविधान दिनी या दोन ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात येणे हे पालघर जिल्ह्यासाठी मोठी ऐतिहासिक गोष्ट ठरली. तेथे सरपंच दोन्ही ग्रामपंचायतचे उपस्थित होते .आल्यावर ग्रामपंचायत मधील सर्वांना हा पुरस्कार आम्हीच स्वीकारत आहोत असे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता.
✔ ग्रामपंचायतींची प्रतिक्रिया
पुरस्कार मिळाल्याने दोन्ही ग्रामपंचायतींनी एकमुखाने हे यश ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असे सांगितले. “ग्रामविकास ही केवळ फाईल व कागदांची प्रक्रिया नसून ती लोकांच्या विश्वासावर उभी असते. हा सन्मान आम्हाला आणखी प्रेरणा देणारा आहे,” असे सरपंचांनी सांगितले.
✔ पुढील विकास आराखडा
पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ग्रामपंचायतींनी पुढील काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या—
१०० टक्के स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्त गाव मिशन
जलसंधारण व वृक्षलागवड कार्यक्रम.
डिजिटल ग्रामपंचायत सेवा केंद्रात नवीन सुविधा
युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण प्रकल्प
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विशेष उपक्रम
✔ पालघर जिल्ह्याचा गौरव
दापोली आणि उमरोळी ग्रामपंचायतींच्या या दुहेरी यशामुळे पालघर जिल्ह्याचे नाव राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. संविधान दिनी मिळालेला हा मानांचा वर्षाव हा जिल्ह्याच्या विकासदृष्टीचा दस्तऐवज ठरतो.